केवळ कर्मच आपले आहे

 कर्म 




*संकटआल्यावर कोणीही कोणाचे नाही* 

 

*सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते.*

 

*द्रौपदीचे रक्षक पाच पाण्डव होते वस्त्र हरण झाले,तेव्हा कोणी नव्हते.*

 

*राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते,*

*जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते*

 

*लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता;*

*पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते.*

 

*श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते,*

*जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते.*

 

*लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते.*

*पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते.*

 

*शरशय्या वरती भीष्म पितामह होते.*

*वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते.* 

 

*राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते,*

*पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते,*

 

*सर्वां साठी,त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे,*

*या जगात आपले कोणी ही नाही.*

 

*ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे,त्या पुढे कोणी जाऊ शकत नाही.*

 

*जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर* 

*हेच सत्य आहे.*

 

*केवळ कर्मच आपले आहे*       

     

   *एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही.*

*फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विझवु शकत नाही..*

 

धन्यवाद....!

Post a Comment

0 Comments